बातम्या

राज्यातील धरणांमधील जलसाठा ‘डेंजर झोन’मध्ये

सकाळ न्यूज नेटवर्क

नाशिक - मॉन्सूनने वेळेवर हजेरी लावली नाही. मॉन्सून अद्याप राज्याचा उंबरा ओलांडण्याची चिन्हे नसल्याने राज्यातील धरणांमधील जलसाठा ‘डेंजर झोन’मध्ये पोचलाय. गेल्या वर्षीच्या तुलनेत ३ हजार २६७ मोठ्या, मध्यम आणि लघू प्रकल्पांमधील साठा तिपटीने कमी असून, आता ६.८५ टक्के पाणी शिल्लक आहे. लघू प्रकल्पांमध्ये ४.६४ टक्के पाणी उरले असल्याने चिंतेत भर पडली आहे.

विभागनिहाय धरणांमध्ये शिल्लक असलेल्या जलसाठ्याची टक्केवारी पुढीलप्रमाणे असून, (कंसात गेल्या वर्षीच्या ११ जूनच्या जलसाठ्याची टक्केवारी) ः अमरावती - ७.७६ (११.४९), औरंगाबाद - ०.५४ (१५.६६), कोकण २५.९७ (३४.१६), नागपूर ५.८४  (११.४६), नाशिक - ५.१८ (१५.२८), पुणे - ६.४९ (१९.८२). गेल्या वर्षी राज्यातील सर्व धरणांमध्ये १७.८४ टक्के पाणी शिल्लक होते. ही सारी परिस्थिती पाहता, कोकण वगळता इतर भागांतील कोरड्याठाक धरणांची संख्या वाढत चालली आहे. 

राज्यातील ३४ प्रकल्प कोरडे
राज्यातील एकुण १४१ मोठ्या प्रकल्पांपैकी ३४ प्रकल्प कोरडे झाले आहेत. त्यात नाशिक प्रदेशातील आठ प्रकल्पांचा आणि इतर तीन प्रकल्पांचा समावेश आहे. राज्यातील २५८ मध्यम आणि २ हजार ८६८ लघू प्रकल्पांपैकी कोकण विभागाचा अपवाद वगळता इतर प्रकल्पांमधील साठा असून नसल्यासारखा आहे.

Web Title: Only seven percent of water left in the dam in Maharashtra

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thane Lok Sabha: कोण होणार ठाण्याचा खासदार? ठाकरे गट आणि शिंदे गट आमने सामने

Salman Khan House Firing Case: सलमान खान गोळीबार प्रकरणात गँगस्टर रोहित गोदाराची एन्ट्री

Pune News : रात्री 12 वाजता बॅंक सुरु! निवडणूक आयोगाची बॅंकेवर मोठी कारवाई

Special Report : Election Scam | माढ्यात नकली नोटांचा पाऊस! उत्तम जानकरांचा आरोप काय?

IPL 2024 DC vs RR: घरच्या मैदानात दिल्लीची फटकेबाजी; राजस्थानसमोर २२२ धावांचे आव्हान

SCROLL FOR NEXT